Monday, 30 April 2012

asech

कोण आपलं ,कोण परकं ,
शब्दांचे खेळ नुसते ...
कोण आपली साथ देइल,
याची पण एक वेळ असते.


बोलायला गेले तर
आयुष्य पूरणार नाही
मनातले सारे सांगायला
शब्द उरणार नाही


तुझ्यासाठी पापण्यांच्या
रोज ओलावती कडा
आठवांच्या ओंजळीत
तुझा प्राजक्ताचा सडा

नांदे नेहमी श्रावण
माझ्या पापण्यांच्या काठी
आसवांनी भारलेले
दोन डोह तुझ्यासाठी

पाऊस

दारावर बेल वाजली..

दार उघडून पाहतो तर बाहेर
कुणीच नव्हतं..
फ़क्त जोराचं वारं सुटलं होतं..

थोड्यावेळाने पुन्हा बेलचा आवाज..

दार उघडलं.. .. बाहेर कुणीच नाही...

... विचार करत करत आत येवून बसलो
आणि पुन्हा बेलचा आवाज...

आणि एकदम लक्षात आलं..
हसत हसत तिला आवाज दिला..
..
..
..
..

"अगं दार उघड बाहेर येवून...

तुला पाहिल्याशिवाय
बरसायचा नाही पठ्ठ्या...!! :)
 
 
 
*******************************
 
बघ.. तुझ्या आठवणी इतक्या तीव्र
आहेत की
आकाश सुध्दा

ओघळत ओघळत

खाली येतं..... !!
 
 
 

वाळु

वाळुवर बनवलेली
दोन घरं मी स्वत:ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहुण गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची....................

पाऊस

तुझेच रोज व्हायचे प्रिया असे हळू हळू
नभात भेटती शशी निशा जसे हळू हळू

अता कुठे मला दिसे वसंत रोज पाहुणा
फुले फुलेच शोधती तुला कसे हळू हळू

तुला मिठीत घेउनी नभापल्याड जायचे
न भेटताच चांद तो प्रिया रुसे हळू हळू


**********************************


कोसळणारा पाऊस अस का वागतो?
प्रतीक्षेत तीच्या आभाळ फ़ाडून रडतो..

माझ्या डोळ्यात दाटलेला पाऊस पडत का नाही?
विचारले तर.... तूझ्या आसंवाच कारण सांगतो

:( :( :(

:) :) :)

प्रेम

प्रेम जर वेदना ! .. तर आपण का सूखावतो ?
प्रेम जर सुख ! .. तर आपण का दुखावतो ?
प्रेम जर पाणी ! .. तर आपण का जळतो?
प्रेम जर उब ! .. तर आपण का थरथरतो ?
प्रेम जर आनंद !.. तर आपण का रडतो?
प्रेम जर शाश्वत!.. तर आपण का मरतो ?
म्हणुन ....
प्रेम हे प्रेम असावे. ती मजबूरी नसावी
तुझे प्रेम नेहमीच माझी गरज असावी.

तुझे आणि माझे नाते

तुझे आणि माझे नाते
आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

... करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

माझ 'मी"पण !! आठवणी

माझ 'मी"पण !!
परत तुझ्या मधाळ,
वेडावणाऱ्या ...स्वप्नाना भुलून,
कि कधीच नव्हते जे माझे ,
त्या मनाची खोटीशी समजूत घालून


आठवणी विसरण्याचा मी खूप प्रयत्न केला
पहिली विसरताच दुसरीत जीव गुंतत गेला...
आठवणीच्या धाग्यात माझा मीच वाहत आहे
धाग्याचे टोक आठवण्याचाच प्रयत्न आता बाकी आहे...

 
 
 

मन कधी कधी .........

मन कधी कधी .........

मन कधी फ़सत,मन कधी रुसत...
कुनाला हे कळत,कुणी उगाचच हसत..
हसताना मनात बरंच काही असतं...
सांगायला मात्र काही जमत नसत...
समजुन घ्यावं असं खुप वाटतं....
समजतय तिला हेही कळत....
शब्दांच्या शोधात मन हरवत...
न बोलताच मग डोळ्यांना समजत..
गालावरच्या खळीत उत्तर मिळतं....
पापन्यांखाली ते हळुच लपतं.........



मनाच रुसन फुगण रोजच..
मनाच आठवणीत हरवन रोजच ..
ज्याला ते कळत ..
मनाच त्याच्या माणसाशी नात जुळत ..
शब्दांशी मनाच काही केल्या पटत नाही ...
शब्दांशिवाय त्याच काही केल्या अडत नाही ..
अशा वेळी डोळेच मग साथ देतात..
आपोआपच तुझ्या हाताला स्पर्श माझे हाथ देतात

Wednesday, 4 April 2012

वाढदिवस

आज वाढदिवस आहे तुझा
बघ माझी आठवण येते का ?
सकाळ सकाळ आरश्यात बघ ,...
बघ माझी आठवण येते का ?
मोबाईल उचल, इनबॉक्स खोल ,
...बघ माझी आठवण येते का ?
तिथेही नाही दिसलो तर ,
ओर्कुट फेसबुक खोल ,
बघ माझी आठवण येते का ?
नाहीच दिसलो कुठे तर ,
जरा काळजात हात घाल ,
बघ माझी आठवण येते का ?
पिल्या पहिली  जागी तर हो ,
स्वप्नात पण मीच
मग आठवण येणारच.....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

एकटेपणाची नशा.....!!

वाटतं...
चालत जावं....
आकाशाच्या भिंती ओलांडून....
नसलेलं असलेपण पाठंगूळी मारून....

... वाटतं....
विखरून जावं....
भोवतालचं भवंडलेपण...
उद्धृत वाटांच्या माथी मारून...

वाटतं...
कधी न कळावं....
नगण्य व्यवहारीपणाच्या...
शून्याचे घरंगळलेपण....

वाटतं....
कधी न कळावी...
वर्दळीची भाषा....
अन्‌ चढत जावी....

एकटेपणाची नशा.....!!
वाटतं...
चालत जावं....
आकाशाच्या भिंती ओलांडून....
नसलेलं असलेपण पाठंगूळी मारून....

... वाटतं....
विखरून जावं....
भोवतालचं भवंडलेपण...
उद्धृत वाटांच्या माथी मारून...

वाटतं...
कधी न कळावं....
नगण्य व्यवहारीपणाच्या...
शून्याचे घरंगळलेपण....

वाटतं....
कधी न कळावी...
वर्दळीची भाषा....
अन्‌ चढत जावी....

एकटेपणाची नशा.....!!

Monday, 2 April 2012

प्रवासी

जीवनाच्या वाटेवरचे आपण सारे प्रवासी
जग नावाच्या घरामधले तात्पुरते निवासी
कितीक आले कितीक गेले अमर नाही कोणी
आयुष्याभर साथ देती फ़क्त आठवणी.

एक विनंती आहे........

एक विनंती आहे........
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नको,
busy आहे सांगुन टाळायचचं
असेल तर
वेळच देऊ नका.....

एक विनंती आहे....
चौकशी भरे,call,काळजी वाहू,sms
यांचा
...कटांळाच येणैर असेल तर
कोणाला नंबर
देऊ नका,....

एक विनंती आहे......
मौनर्वत स्वीकारायचं असेल
तर
आधी गोडगोड बोलूच नको...
Secrets share करायचीच
नसतील तर
मनाचं दार उघडूच नको.......

एक विनंती आहे......
माझ्या काळजी करण्याचा ञासच
होणार
असेल तर......
अनोळखी होऊनचं वागायचं
असेल तर
माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं
नको.........

एक विनंती आहे......
रागावून निघून जायचचं असेल
तर........
आधी माझ्याशी भांडूच नको....

एक विनंती आहे.....
मनातुन नंतर उतरवायचचं असेल
तर
मनात आधी भरुच नका.....

एक विनंती आहे........

एक विनंती आहे........
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नको,
busy आहे सांगुन टाळायचचं
असेल तर
वेळच देऊ नका.....

एक विनंती आहे....
चौकशी भरे,call,काळजी वाहू,sms
यांचा
...कटांळाच येणैर असेल तर
कोणाला नंबर
देऊ नका,....

एक विनंती आहे......
मौनर्वत स्वीकारायचं असेल
तर
आधी गोडगोड बोलूच नको...
Secrets share करायचीच
नसतील तर
मनाचं दार उघडूच नको.......

एक विनंती आहे......
माझ्या काळजी करण्याचा ञासच
होणार
असेल तर......
अनोळखी होऊनचं वागायचं
असेल तर
माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं
नको.........

एक विनंती आहे......
रागावून निघून जायचचं असेल
तर........
आधी माझ्याशी भांडूच नको....

एक विनंती आहे.....
मनातुन नंतर उतरवायचचं असेल
तर
मनात आधी भरुच नका.....

शेवटची भेट

शेवटची भेट आपली
आजही आठवते
पुन्हा पुन्हा मनाला
तुझ्यासोबत पाठवते

काही आठवणी सुखाच्या
काही आठवणी दु:खाच्या
करून सारे गणित
उरणा-या शून्याच्या

जीवनाचे गोड चाँकलेट
चघळत चघळत खायचं असतं
शुल्लकश्या रागात,उगाच चरफ़डत
माधुर्य त्याचे नाकारायच नसतं

पायाखालची पायवाट
नेहमीचीच वहिवाट होते
चालताना जाणवत नाही
पण वाटेचीच लाट होते

तूझं मला आठवणं
माझं देहभर उजळण
कुणाची नजर न लागो
काळोखात पणतीचं लकाकण

मरण

मरण दाराशी आल्यावर,
मी म्हटलं, " तुला शंभर वर्ष आयुष्य आहे ..
मरण हि आश्चर्याने म्हणालं,
"अरे ! काय हा मनुष्य आहे...!!?

कविता म्हणजे नक्की काय????

कविता म्हणजे नक्की काय????

कविता म्हणजे प्रेमाचा जल्लोष...

कविता म्हणजे मैत्री मध्ये दिलेले वचन...

कविता म्हणजे स्वताचा आनंद....

कविता म्हणजे विरहात खाल्लेली हाय...

... कविता म्हणजे दुःखशल्य संघर्ष ...

कविता म्हणजे Do or Die

क्षण -- माझ्या मित्राची कविता

ती म्हणाली ......तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस....
आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'आठवण' येते.

नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?

हे असं होण शक्य तरी कसं आहे,
...नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.

मी म्हणालो,..... अगं वेडे...
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.

अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.

येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.

तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.

तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो....:)

रातराणीचा बहर,

तो रातराणीचा बहर,
करीतो हृदयावरती कहर.

पसरतो दर्प नशीला बहर,
चढवितो आसक्तीचे जहर.
...
झिंगते आसमंत चारो प्रहर,
उठे मग मनी अनोखी लहर.

जपे मन तो क्षण अन तो प्रहर,
असा तो रातराणीचा बहर.

रातराणीचा बहर,

तो रातराणीचा बहर,
करीतो हृदयावरती कहर.

पसरतो दर्प नशीला बहर,
चढवितो आसक्तीचे जहर.
...
झिंगते आसमंत चारो प्रहर,
उठे मग मनी अनोखी लहर.

जपे मन तो क्षण अन तो प्रहर,
असा तो रातराणीचा बहर.