Monday, 11 June 2012

सागर किनारी या चांदण्या राती..........
सागराची गाज कानावरी येती..........
आठवण तुझी येता मनात वादळ उठती........
वादळ हे शमवायला पावसाची धार लागती..........

पाउस




वातावरण हे इतके सुंदर
अलगड खाली झुकते अंबर
आकाशाच्या छताला  जणू
पावसाच्या थेंबांचे झुंबर !

हळूहळू थंबू लागते पावसाची गाडी
सुन्न होऊन बघत बसते हिरवीगार झाडी
हा पाऊस  जातो कुठे, काही कळत नाही
पुढच्या पावसाची वाट पाहणे,
याशिवाय काही पर्याय उरत नाही !

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

त्याला म्हटलं, टळ की लेका,त्रास का देतोस
तुझी रिमझिम तिची चाहूल काही विसरू देत नाही

तो वाफ़ाळता कप, त्या खिडकीतल्या गप्पा
ते ओलेचिंब भिजणे,डोळ्यांना काही हसू देत नाही

म्हणतो आता जादू बघ, अन हसला गडगडाटी
दारावर टकटक झालं अन पाहतॊ तर ती उभी होती
हसली खुदकन अन ओलेतीच येउन बिलगली
आणि ओढतच मला पावसात घेउन गेली

स्वप्न होते कि हे खरेच घडले होते हेच मुळी कळत नाही
खरंच पावसाचं मला काही कळत नाही
तो सरलाय आता पण तो क्षण काही सरत नाही

मैत्रीच्या पावसात

मैत्रीच्या पावसात
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार  नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.

न्हा‌ऊ घालतोय बघ  मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब

मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून  भिजून बघ मला सर्दी झालीय

पा‌ऊस रिमझिम हसला.
ढगांना घे‌उन क्षितीजावर  जाउन बसला.

जाता जाता म्हणाला,
"काळजी नको. भिजून घे खूप.
भिजणं  थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब ...!